ad

पृथ्वी (EARTH)




            पृथ्वी हा सूर्यमालेतील सूर्यापासूनच्या अंतरानुक्रमे तिसरा तर आकारानुक्रमे पाचवा ग्रह आहे. सूर्यमालेतील खडकाळ ग्रहांमध्ये हा सर्वांत मोठा आहे. पृथ्वीला 'निळा ग्रह' असेही म्हणतात. जिथे जीवन आहे, अशी पूर्ण विश्वात ही एकमेव ज्ञात जागा आहे . पृथ्वीची निर्मिती साधारणपणे ४५७ कोटी वर्षांपूर्वी झालीअसावी आणि तिचा उपग्रह चंद्र साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वी पासून तिला प्रदक्षिणा घालू लागला. हिचा व्यास १२,७५६ कि.मी. एवढा आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर साधारणपणे १४,९५,९७,८९० कि.मी. एवढे आहे. 
        
            पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास २४ तास लागतात. तसेच सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास ३६५ दिवस लागतात. या ३६५ दिवसांच्या कालावधीला आपण एक वर्ष म्हणतो. पृथ्वी तिच्या स्वतःभोवती फिरण्याच्या आसापासून २३.५ अंशांनी कललेली आहे आणि याच स्थितीत ती स्वतःभोवती व सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते म्हणूनच पृथ्वीवर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतुचक्र सुरू असते. 

            पृथ्वीवर सूर्याचा प्रकाश पोहचण्यासाठी साधारणत: ८ मिनिटे २० सेकंद लागतात. पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार मार्गाने प्रदक्षिणा पूर्ण करते. या प्रदक्षिणेमध्ये थोडाजरी फरक पडला असता तर पृथ्वीवर कदाचित जीवसृष्टी निर्माण झाली नसती; पृथ्वीची रचना, गुरुत्वाकर्षण, सूर्यापासूनचे ठरावीक अंतर आणि पृथ्वीवर असलेले वातावरण यामुळेच तिच्यावर जीवसृष्टी निर्माण झाली असावी.

पृथ्वीशिवाय इतर कोणत्याही गृहावर जीवसृष्टी नाही. पृथ्वी स्वतः चुंबक असल्याने पृथ्वीभोवती चुंबकिय क्षेत्र आहे, या चुंबकीय क्षेत्रमुळे सूर्यापासून येणारे हानीकारक किरण पृथ्वीच्या ध्रवीय क्षेत्राकडे वळतात.

पृथ्वीच्या गती :

पृथ्वी ही गतिमान असल्यामुळे पृथ्वीवर दिवसरात्र पूर्ण होतात, एक वर्ष होते, इ. अशा घटना घडतात. अशा काही घटना पृथ्वीच्या भ्रमणामुळे होते. पृथ्वीच्या काही विशेष गती आहेत.
  • अक्षीय गती – पृथ्वीच्या स्वतःच्या अक्षाभोवती फिरण्याच्या गतीला अक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती २३ तास ५६ मिनिटे आणि ४.०९९ सेकंदात एक फेरी पूर्ण करते. पृथ्वीच्या अक्षीय गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होतात. पृथ्वीचा अक्ष कललेला असल्यामुळे दिवस आणि रात्र यांच्या वेळेत फरक आढळतो.
  • कक्षीय गती – पृथ्वी ज्या गतीने तिच्या कक्षेत फिरते त्या गतीला कक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वीच्या कक्षीय गतीचा वेग 1 वर्ष आहे.
  • परांचन गती – पृथ्वीच्या अक्षाच्या फिरण्याच्या गतीला परांचन गती म्हणतात. पृथ्वीचा जो अक्ष आहे तो आकाशात २६ हजार वर्षांत एक फेरी पूर्ण करतो. म्हणजेच सुमारे 72 वर्षांनी हा अक्ष एक अंश सरकतो. या परांचन गतीमुळे ठरावीक काळाने पृथ्वीचा ध्रुवतारा बदलत असतो. अक्षाच्या स्थितीत होणारा हा बदल कालांतराने कालांतराने ऋतुचक्राचा आरंभ आणि त्याच्याशी निगडीत असलेला महिना याचा संबंध बदलून टाकतो. सध्या चैत्र महिन्यात वसंत ऋतुचे आगमन होत असेल तर सुमारे 2100 वर्षांनी त्याचा प्रारंभ वैशाख महिन्यात होऊ लागेल.
  • अक्षाच्या कोनाची गती – पृथ्वीचा अक्ष आज साडे तेवीस अंशातून कललेला असला तरी अक्षाचा हा कोनसुद्धा स्थिर नाही. ही अक्षाची तात्पुरती स्थिती आहे. सुमारे 42 हजार वर्षात अक्षचा कोन 22 अंशापासून वाढतो आणि पुन्हा 22 अंशापर्यंत खाली उतरतो. अक्षाच्या या आवर्तनामुळे एकाच स्थानावरील ऋतुंच्या तीव्रतेमध्ये कमी जास्त फरक पडेल. समजा, पथ्वीचा अक्ष 25 अंशातून कलला, तर उत्तर भारतात हिवाळ्यांमध्ये बर्फ पडण्याची शक्यता आहे.
पृथ्वीचे अंतरंग :


            पृथ्वीच्या सर्वांत वरचे आवरण म्हणजे भूकवच होय. त्याखाली प्रावरण असते. प्रावरणाखाली बाह्यगाभा व त्याखाली अंतर्गाभा असतो.
            पृथ्वीची आकृति अंडाकार आहे. घुमावामुळे, पृथ्वी भौगोलिक अक्षावर चपटे आणि भूमध्य रेखा जवळ उंचवटा घेतल्या सारखे दिसते. भूमध्य रेखा वर पृथ्वीचे व्यास, अक्ष-ते-अक्षच्या व्यास पासून ४३ किलोमीटर (२७ मैल) जास्त मोठा आहे. अशा प्रकारे पृथ्वीच्या केंद्रापासून तळापर्यंतची सर्वात लांबचे अंतर, इक्वाप्रकारे भूमध्यवर्ती चिंबोराज़ो ज्वालामुखीच्या शिखर पर्यंतची आहे. अशा प्रकारे पृथ्वीचे जवळपास व्यास १२,७४२ किलोमीटर (७, ९१८ मैल) आहे. काही जागेची स्थलाकृति या आदर्श मापापेक्षा वेगळी दिसते. जेव्हा की वैश्विक स्तरावर हे पृथ्वीच्या त्रिज्याच्या तुलनेत नजरअंदाज केलेले दिसतें. सर्वात जास्त विचलन ०.१७%चे मारियाना गर्त (समुद्रीस्तर पासून १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) खाली) मध्ये आहे जेव्हा की माउंट एवरेस्ट (समुद्र स्तर पासून ८,८४८ मीटर (२९,०२९ फीट) वर) ०.१४%चे विचलन दर्शविते. जर पृथ्वी, एक बिलियर्ड चेंडूच्या आकारात असेल तर, पृथ्वीचे काही क्षेत्र जसे मोठे पर्वत श्रृंखला आणि महासागरीय दरी, लहान दरींसारखी दिसतील जेव्हा की ग्रहांचा अधिकतम भू-भाग, जसे की विशाल हिरवेगार मैदान आणि शुष्क पठार इत्यादी, गुळगुळीत दिसतील.

चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३ लाख ८४ किमी आहे. चंद्राचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या १/६ पट आहे. चंद्र आदल्या दिवशी पेक्षा ५० मिनिटे उशीरा उगवतो. चंद्र हा पृथ्वीचा एकमेव उपग्रह आहे. हा साधारणपणे ४५३ कोटी वर्षांपूर्वीपासून पृथ्वीला प्रदक्षिणा घालू लागला.

जलमंडल

पृथ्वी तळाच्या उंचीचा हिस्टोग्राम पृथ्वीच्या तळावर पाण्याची विपुलता एक अद्भूत वैशिष्ट्य आहे जे सौर मंडळाच्या अन्य ग्रहांपासून या "निळ्या ग्रहाला" वेगळे करते. पृथ्वीच्या जलमंडळात मुख्यतः महासागर आहे परंतु तांत्रिक रूपेण दुनियेत उपस्थित इतर पाण्याचे स्रोत जसे: अंतर्देशीय समुद्र, तलाव, नदी आणि २००० मीटर खोल भूमिगत पाण्यासहित यात सामावले आहे. पाण्यातील सर्वात खोल जागा १०,९११.४ मीटर खोल प्रशांत महासागर मध्ये मारियाना ट्रेंचची चैलेंजर डीप आहे.

महासागरांचे द्रव्यमान सुमारे १.३५×१०१८ मीट्रिक टन किंवा पृथ्वीच्या एकूण द्रव्यमानचे १/४४०० हिस्सा आहे. महासागर सुमारे ३६८२ मीटर खोल ३.६१८×१०८ किमी २ क्षेत्रफळामध्ये पसरलेला आहे. ज्याची अनुमानित मात्रा


पृथ्वीचे वातावरण : 




पृथ्वीचे वातावरण हा पृथ्वीच्या पृष्ठभागालगत तिच्या गुरुत्वाकर्षणामुळे लपेटून असलेला वायूंचा थर आहे. यावातावरणात नायट्रोजन (७८.00 %), ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे. पृथ्वीच्या वातावरणातील वायूंच्या या मिश्रणास हवा असे म्हणतात.

पृथ्वी आणि इतर ग्रह व मोठे उपग्रह यांच्या भोवतालचे अनेक वायूंच्या मिश्रणाचे (हवेचे) आवरण म्हणजे वातावरण होय. पुरेशा सामर्थ्यवान गुरुत्वाकर्षणामुळे वातावरण या स्वस्थ गोलांच्या पृष्ठभागाला चिकटून राहते. स्वस्थ गोल स्वतःभोवती आणि इतर तारे किंवा ग्रह यांच्याभोवती आपल्या आवरणासह निरनिराळ्या अंतरांवरून फिरत असतात. सूर्यकुलातील बुध या उपग्रहाखेरीज बहुतेक सर्व ग्रहांभोवती कमीअधिक प्रमाणात वातावरण आहे. सूर्यापासून दूर असलेल्या ग्रहांभोवती फिरणारे मोठे उपग्रहसुद्धा याला अपवाद नाहीत. हवेशिवाय माणूस जगू शकत नाही. हवा ही सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी आवश्यक आहे.

पृथ्वीचा जन्म ज्या वायूच्या व धुळीच्या ढगापासून झाल्याचे मानतात. त्याच्याशी सध्याच्या वातावरणाचा फारसा संबंध राहिलेला नाही, असे आढळले आहे. पृथ्वीवर ज्वालामुखीतून उत्सर्जित झालेली बाष्पनशील (बाष्परूपात वर आलेली ) द्रव्ये, भूकवचातील खडक, पाणी व पृथ्वीवरील जीवसृष्टी यांनी एकमेकांवर वेळोवेळी केलेल्या रासायनिक व इतर प्रकारच्या प्रक्रियांचा परिणाम होऊन सध्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. वातावरणात बदल घडवणाऱ्या अशा प्रक्रिया सौर प्रारणाच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) तीव्रतेवर आणि गुरुत्वांकर्षणाच्या प्रभावावर अवलंबून असतात.

पृथ्वीच्या वातावरणाचे एकूण वजन ५.६×१०१५ टन (५६ लक्ष अब्ज टन, १ टन = १,०१६ किग्रॅ.) असून ते पृथ्वीच्या वजनाच्या एक दशलक्षांश आहे. वातावरण पृष्ठभागापासून वर शेकडो किमी. उंचीपर्यंत पसरलेले आहे. वातावरणाची घनता व दाब वाढत्या उंचीनुसार कमी कमी होत जातात. पण तापमानात मात्र चढ उतार होत असलेले दिसतात. पृष्ठभागालगत वातावरणाची घनता १.२९ किग्रॅ./मी.3 असून ४० किमी. उंचीवर घनता फक्त ४ ग्रॅ./मी.३ इतकी कमी होते. वातावरणाचा सुमारे ९९% भाग पृष्ठालगतच्या फक्त ३० किमी. जाडीच्या थरांत सामावलेला आहे. मानवावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या हवामानाच्या बहुतेक घटना यात थरांत घडतात. वातावरणाच्या अति-उच्च निर्वात सम विभागांत सौर प्रारण व चुंबकीय क्षेत्र यांच्या प्रभावाखाली वायुरेणूंच्या एकमेकांशी रासायनिक विक्रिया चालू असतात; पण त्याचे परिणाम भूपृष्ठाजवळ सहजपणे प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळत नाहीत. समुद्रसपाटीला सरासरी वातावरणीय दाब १,०१३ मिलिबार असतो (१ मिलिबार = १,००० डाइन/सेंमी.२ = वातावरणीय दाबाचा हजारावा भाग). पृथ्वीसभोवार पाण्याचे १० मी. जाडीचे वेष्टन आहे, असे मानल्यास ते वातावरणाइतका दाब निर्माण करील. हवेचे तापमान, आर्द्रता, वारे व ऋतू यांसारख्या घटकांच्या परिणामामुळे भिन्न ठिकाणच्या दाबांत फरक असतो. वाढत्या उंचीनुसार कोणत्याही ठिकाणावरील वातावरणाच्या स्तंभाची उंची कमी होत असल्यामुळे वातावरणीय दाब उंचीनुसार घातीय प्रमाणात कमी कमी होतो.

पृथ्वीला सूर्यापासून ऊर्जा प्राप्त होते. या ऊर्जेचा जवळजवळ ४२% भाग वातावरणातील धुळीचे कण, वायुरेणू, ढग हिम तसेच वाळवंटी प्रदेश यांच्याकडून अवकाशात परावर्तित केला जातो. तसाच ऊर्जेचा काही थोडा भाग परावर्तनाने व प्रकीर्णनाने (विखुरला जाऊन) वातावरणात शोषिला जातो. मात्र प्रत्यक्ष सौर किरणामुळे वातावरण फारसे तापू शकत नाही म्हणजे वातावरण सौर ऊर्जेला बहुतांशी पारदर्शक असते. वातावरण पार करून भूपृष्ठावर आलेल्या सौर किरणांनी समुद्र, खडक व वन्यसृष्टी ही प्रथम तापतात आणि नंतर त्यांना चिटकून असलेली हवा संवहन व अभिसरण क्रियांनी तापते. तापलेली हवा हलकी होऊन वर उचलली जाते व तिच्या जागी थंड हवा येऊन तशीच क्रिया सुरू होते. विषुववृत्ताचा परिसर अधिक तापत असल्यामुळे विषुववृत्तापासून ध्रुवांकडे व भूपृष्ठापासून ऊर्ध्व (वरच्या) दिशेत तापमान कमी होत जाते. त्यामुळे वारे निर्माण होऊन त्यांच्याद्वारे उष्णतेचे वितरण होते. अशा तऱ्हेने सुमारे ५८% ऊर्जेचा विनिमय होतो. तापलेले भूपृष्ठ व उष्ण हवा दीर्घ तरंगलांबीचे अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) प्रारण उत्सर्जित करू लागतात. यातील काही भाग ढगांवरून परत पृथ्वीकडे परावर्तित होतो. यामुळे ढग असतील त्या ठिकाणी भूपृष्ठ थंड होत नाही. सौर प्रारण शोषणाने पाण्याची वाफ होते व ती वातावरणांत मिसळून वातावरणाला ऊर्जा प्राप्त होते. वाफेचे संद्रवन (पाण्यात रूपांतर) झाल्यावर उष्णता बाहेर पडून परिसराचे तापमान वाढते. पाण्याची वाफ व कार्बन डाय-ऑक्साइड वायू यांच्यातून लघू तरंगलांबीचे प्रकाश किरण आरपार जातात; पण पृथ्वीकडून उत्सर्जित होणारे दीर्घ तरंगलांबीचे अवरक्त प्रारण त्याच्यात शोषले जातात. अशा तऱ्हेने वातावरण मुख्यतः तळाकडून वर तापत जाते. वातावरणातील हवेची स्थलांतरे (किंवा वारे) प्रक्षोभी (खळबळजनक) असण्याचे हे एक कारण आहे. समुद्रपृष्ठवरून तापत असल्यामुळे सागरातील पाण्याची स्थलांतरे (किंवा प्रवाह) तितकी प्रभावी असत नाहीत. दिवसभरात शोषलेल्या ऊर्जेचे वितरण गतिमान वाऱ्याकडून सर्वत्र होत राहते.

वातावरणात तरंगणारे जलबिंदू, धूलिकण व वायुरेणू यांमुळे आकाशातील ग्रह, ताऱ्यांचे वेध घेण्यास अडथळा होत असला, तरी त्यांच्यामुळे इंद्रधनुष्य, चंद्राला व सूर्याला पडणारी खळी, सूर्योदयापूर्वी व सूर्यास्तानंतर क्षितिजावर दिसणारे मनोवेधक रंग इ. सौंदर्यंपूर्ण आविष्कार पृथ्वीवरून पहावयास मिळतात.

वातावरणाने पृथ्वीवरील जीवांना संरक्षण मिळते. उच्च वातावरणातील ओझोन वायूचा थर सौर प्रारणातील जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरण शोषून घेतो. यामुळे या विनाशकारी प्रारणाचा पृथ्वीवरील सजीवांना उपद्रव होत नाही व पृथ्वीचे तापमान प्रमाणाबाहेर वाढत नाही. वातावरण नसते, तर दिवसा पृथ्वी ९४० से. पर्यंत तापून रात्री -१८५ ०से. इतकी थंड झाली असती व तापमानांतील इतका मोठा दैनंदिन फरक जीवसृष्टीस अपायकारक झाला असता. माणूस व इतर प्राण्यांनी निःश्वासित केलेल्या कार्बन डाय-ऑक्साइड वायूमुळे वनस्पतींचे संवर्धन होते. उलट मानव व अन्य प्राण्यांना वनस्पती ऑक्सिजन वायू उपलब्ध करून देतात. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे नियंत्रण होते. एखाद्या क्षेत्रातील भूपृष्ठ खूप तापल्यास त्यालगतची हवा उष्ण व हलकी होते आणि वर जाऊ लागते व चोहोअंगानी विविध गुणधर्मांच्या वायुराशी त्या क्षेत्रांत प्रवेश करतात आणि मेघनिर्मिती व पर्जन्यासारख्या अनेकविध वातावरणीय आविष्कारांची शृंखला निर्माण होते व शेवटी वातावरणाला त्याची पूर्वस्थिती प्राप्त होते. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे तेथे अशा प्रकारचे वातावरणातील आविष्कार घडू शकत नाहीत. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे प्रतिदिनी काही कोटी अशनी (पृथ्वीबाहेरून येणारे खडकाचे तुकडे) सेकंदाला १६ किमी. वेगाने पृथ्वीकडे खेचले जातात. त्यांच्या माऱ्यापासून पृष्ठभागाचे व सजीवांचे संरक्षण केवळ वातावरणामुळे होत असते. वातावरण प्रक्षोभी होते त्या वेळी पृष्ठभागावर अनेक बदल घडून येतात.

ओझोन थर : 

                             

    पृथ्वीचा ओझोन थर, पृष्ठभागापासून 10 ते 30 किलोमीटर वर स्ट्रॅटोस्फियरमध्ये स्थित आहे, हा सूर्यापासून हानिकारक अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणोत्सर्गाविरूद्ध एक महत्त्वपूर्ण ढाल आहे. ओझोन रेणू (O3) चे बनलेले, ते सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणे शोषून आणि फिल्टर करून पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करते.

ओझोन थर कमी होण्याची कारणे:
मानवी क्रियाकलाप हे ओझोन थर कमी होण्याचे प्राथमिक चालक आहेत. क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs), हॅलोन्स, कार्बन टेट्राक्लोराइड आणि मिथाइल क्लोरोफॉर्मसह वातावरणात सोडल्या जाणार्‍या विविध रसायनांमध्ये क्लोरीन आणि ब्रोमाइन अणू असतात जे शेवटी स्ट्रॅटोस्फियरपर्यंत पोहोचतात. एकदा तिथे गेल्यावर हे अणू ओझोनचे रेणू मोडून टाकू शकतात, ज्यामुळे ओझोनचा थर कमी होतो.

 क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFC) :
क्लोरोफ्लोरोकार्बन्स (CFCs) मोठ्या प्रमाणावर रेफ्रिजरंट्स, एअर कंडिशनिंग सिस्टम, एरोसोल प्रोपेलेंट्स आणि फोम-ब्लोइंग एजंट्समध्ये वापरले जात होते. वातावरणात सोडल्यावर, सीएफसी स्ट्रॅटोस्फियरपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे स्थिर असतात, जेथे ते अतिनील किरणोत्सर्गामुळे तुटतात, क्लोरीन अणू सोडतात. हे क्लोरीन अणू नंतर उत्प्रेरकपणे ओझोन रेणू नष्ट करतात.

 हॅलोन्स :
अग्निशामक उपकरणांमध्ये आढळणारे हॅलोन्स, अग्निशमन किंवा अपघाती आगीच्या वेळी बाहेर पडल्यावर ओझोन थर कमी होण्यास हातभार लावतात. हॅलोन्स ब्रोमिन अणू सोडतात, जे क्लोरीन अणूंच्या तुलनेत प्रति-अणू आधारावर ओझोन नष्ट करण्यासाठी अधिक प्रभावी असतात.

image by NASA

ओझोन थर कमी होण्याचे परिणाम :

ओझोन थर कमी झाल्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर अतिनील किरणोत्सर्गाचा प्रवाह वाढतो. या वाढलेल्या अतिनील विकिरणामुळे मानवी आरोग्य, परिसंस्था आणि पर्यावरणाला महत्त्वपूर्ण धोका निर्माण झाला आहे. त्वचेचा कर्करोग, मोतीबिंदू आणि इतर समस्या यासारख्या आरोग्याच्या समस्या UVB किरणोत्सर्गाच्या वाढीशी निगडीत आहेत.

 आंतरराष्ट्रीय प्रतिसाद - मॉन्ट्रियल प्रोटोकॉल:
1987 मध्ये, आंतरराष्ट्रीय समुदायाने मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली, ज्याचा उद्देश ओझोन-क्षीण करणाऱ्या पदार्थांचे उत्पादन आणि उपभोग टप्प्याटप्प्याने बंद करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचा करार आहे. या कराराने ओझोन थर कमी होण्याच्या मूळ कारणांचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून चिन्हांकित केले.

 मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे यश :
मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने अनेक ओझोन कमी करणाऱ्या रसायनांचे उत्सर्जन कमी करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे ओझोनचा थर पूर्वपदावर येण्याची चिन्हे आहेत. हानिकारक पदार्थांना टप्प्याटप्प्याने बाहेर काढण्याच्या वचनबद्धतेने हे दाखवून दिले आहे की आंतरराष्ट्रीय सहकार्याचा जागतिक पर्यावरणीय समस्यांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

आव्हाने आणि कायम समस्या :
मॉन्ट्रियल प्रोटोकॉलने भरीव यश मिळवले आहे, तरीही आव्हाने कायम आहेत. ओझोनचा ऱ्हास करणाऱ्या पदार्थांचे विद्यमान साठे तसेच नवीन संभाव्य हानिकारक पदार्थांचा उदय, सध्या सुरू असलेल्या चिंतेला तोंड देत आहे. काही रसायनांचे फेज-आउट ही एक जटिल प्रक्रिया आहे ज्यासाठी आंतरराष्ट्रीय करारांचे सतत निरीक्षण आणि समायोजन आवश्यक आहे.

 वैज्ञानिक निरीक्षणे आणि पुनर्प्राप्ती :
अलीकडील वैज्ञानिक निरीक्षणे ओझोन थराची हळूहळू पुनर्प्राप्ती दर्शवतात. ओझोन कमी करणाऱ्या पदार्थांचे उत्पादन आणि वापर कमी झाल्याने या सकारात्मक प्रवृत्तीला हातभार लागला आहे. पुनर्प्राप्तीची ही चिन्हे ओझोन थराच्या संरक्षणासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करतात.

 सतत दक्षता आणि सहकार्य :
ओझोन थराची संपूर्ण पुनर्प्राप्ती आणि संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी, सतत दक्षता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे. प्रगती असूनही, काही ओझोन कमी करणारे पदार्थ टिकून राहणे आणि नवीन पदार्थांचा संभाव्य परिचय जागतिक समुदायाकडून सतत वचनबद्धतेची गरज अधोरेखित करते.

 निष्कर्ष :
शेवटी, ओझोन थर कमी होणे हा मानवी क्रियाकलापांचा परिणाम आहे ज्यामुळे वातावरणात ओझोन कमी करणारे पदार्थ सोडले जातात. क्षीणतेमुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणास महत्त्वपूर्ण धोका निर्माण होतो. आंतरराष्ट्रीय प्रयत्न, विशेषत: मॉन्ट्रियल प्रोटोकॉलद्वारे, या पदार्थांच्या वापरावर अंकुश ठेवण्यात आणि पुनर्प्राप्तीला चालना देण्यात यशस्वी झाले असले तरी, भावी पिढ्यांसाठी ओझोन थर पूर्णपणे पुनर्संचयित करण्यासाठी आणि संरक्षित करण्यासाठी शाश्वत वचनबद्धता आणि सहकार्य आवश्यक आहे. ओझोन थर कमी होण्याची कथा ही जागतिक समुदायाच्या सामूहिक कृतीद्वारे पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्याच्या क्षमतेचा पुरावा आहे.

उत्तरायण आणि दक्षिणायन :



पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते. हे जरी सर्वांना माहीत असले तरी तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून २३. ५ अंशाने कललेला आहे हे मात्र अनेकांना माहित नसते. पृथ्वी २३. ५ अंशाने एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीमध्ये ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते. पृथ्वीदेखील कललेल्या अवस्थेमध्येच सूर्याभोवती फेरी मारीत असल्याने काही वेळेस पृथ्वीचा उत्तर ध्रृवाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांनी पृथ्वीच्या दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ येतो. तर सहा महिन्यांच्या अंतराने दोन दिवशी सूर्य-पृथ्वी अंतर सारखेच असते. पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तेथे उन्हाळा तर जी बाजू दूर असते तेथे हिवाळा असतो. कमी-जास्त तापमानामुळे ऋतू होतात. जर अक्ष कललेला नसता तर ऋतू झालेच नसते. आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. २१ मार्च ते २१ जून पर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच 'उत्तरायण' असे म्हणतात. तर २२ सप्टेंबर तर २२ डिसेंबर पर्यंत सूर्य दक्षिण दिशेस सरकतो. यालाच 'दक्षिणायन' असे म्हणतात. तर २२ मार्च आणि २२ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेस उगवतो. ह्या दोन तारखांना 'विषुवदिन' असे म्हणतात. ह्या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात.


पृथ्वीसंबंधीची काही परिमाणे व स्थिरांक

परिमाण वा स्थिरांक

मूल्य

विषुववृत्तीय त्रिज्या

,३७८.१६० किमी.

ध्रुवीय त्रिज्या

,३५६.७७४ किमी.

सरासरी त्रिज्या  

,३७१.०३१ किमी.

क्षेत्रफळ (पृष्ठफळ)

५१,००,६९,२६२ चौ. किमी.

घनफळ

१०,८३,२१,८९,१५,००० घ. किमी.

सूर्यपासूनचे कमाल अंतर  

१५.१ कोटी किमी.

सूर्यपासूनचे किमान अंतर  

१४.६ कोटी किमी.

सूर्यपासूनचे सरासरी अंतर  

१४.९५.९८५ कोटी किमी.

चंद्रापासूनचे सरासरी अंतर  

,८४,३२१ किमी.

कक्षेचा परिघ  

९.४ अब्ज किमी.

कक्षेमधील गती निरूढी  

२९.६ किमी./से.

निरूढी परिबल (ध्रुवीय अक्षाभोवतीचे)  

८.०४३ × १०४४ ग्रॅ. सेंमी.

निरूढी परिबल (सरासरी)  

८.०२५ × १०४४ ग्रॅ. सेंमी.

मध्याजवळील दाब  

३७ लाख वा. दा.

मध्याजवळील तापमान  

सु. ४,०००० से. 

विषुववृत्त व क्रांतिवृत्त यांतील कोन 

२३०२७’ 

विषुववृत्तीय प्रतल व भ्रमणाक्ष यांतील कोन

२३ ० ३०’ 

सूर्याभोवती एक फेरी मारण्यास लागणारा काळ (वर्ष)

३६५.२४४दिवस 

स्वतःभोवती एक फेरी मारण्यासलागणारा काळ (दिवस)

२३ ता. ५६ मि. ४.०९१ से. 

विषुववृत्तावर एका रेखांशाचे अंतर

१११.३२ किमी 

एका अक्षांशाचे अंतर  

११०.५६८ किमी. 

सर्वांत उंच ठिकाणाची(मौंट एव्हरेस्टची) उंची

,८४७.७ मी. 

सर्वांत खोल ठिकाणाची(चॅलेंजर खाच, मेअरिआनाखंदक) खोली

११,०३३ मी. 

[पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतराला ज्योतिषशास्त्रीय एकक (ज्यो.ए. म्हणतात. सूर्यकुलातील अंतरे व्यक्त करण्यासाठी हे एकक वापरतात.]  






Post a Comment

0 Comments